Showcasing The Historical Culture, Lifestyle & Royalty Of The Great Holkars
Collection By Milind Dombale (Deshmukh)

Wednesday 9 September 2015

Maharani Tulsabai Holkar (​​महाराणी ​तुळसाबाई होळकर)

महाराजा यशवंतरावांना एकुण दोन अपत्ये झाली. लाडाबाईपासुन भीमाबाई तर मिनाबाईपासुन (काही इतिहासतद्न्यांच्या मते केशरबाईपासुन) मल्हारराव (तिसरे). तुळसाबाईंना अपत्यप्राप्ती झाली नाही. (​​ तुळसाबाई​​ या महानुभाव संप्रदायाच्या व मुळच्या जेजुरी येथील होत्या. हा त्या ​​ काळातील एक अतुलनीय असा आंतरजातीय प्रेमविवाह.) मल्हाररावाला (वय वर्ष ६) होळकरी गादीवर बसवुन त्याच्या तर्फे रिजंट म्हणून महाराणी तुळसाबाई राज्यकारभार पाहु लागल्या. यशवंतरावांच्या मृत्युपासून ते १८१७ पर्यंत यशवंतरावांची दृष्टी ठेवत इंग्रजांना होळकरी राज्यात पाय ठेवू न देण्याची त्यांनी दक्षता घेतली. खरे तर यशवंतरावांच्या मृत्युनंतर होळकरी राज्य आपण सहज गिळून टाकू असे इंग्रजांना वाटले होते. त्यांनी वेगवेगळ्या आमिषांचे प्रस्तावही पाठवले होते. तुळसाबाईंनी त्यांना भीक घातली नाही. इंग्रजांनी मग वेगळी आघाडी उघडली. पण तुळसाबाई कारभार पाहु लागल्यापासुन काही काळानंतर त्यांचा द्वेष करणा-यांची गर्दीही वाढु लागली, कारण माल्कमने त्यांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. काय वाट्टेल ते करुन इंग्रजांना होळकरी राज्य खालसा करणे महत्वाचे वाटत होते.

तुळसाबाईवर करण्यात येणारा पहिला आरोप म्हणजे त्या यशवंतरावांच्या विवाहित पत्नी नव्हत्या. या आरोपाची दखल आपण आधी घेऊयात. ही अन्याबा महानुभाव या जेजुरी येथील गृहस्थाची कन्या होती. ही सुद्धा औरस कि अनौरस यबाबत माल्कमने संशय व्यक्त करुन आपल्या मनोवृत्तीचा परिचय करुन दिला आहे. असो. तुळसाबाई व यशवंतरावांचा परिचय होण्यात शामराव महाडिकांचे अंग होते ही एक दंतकथा तुळसाबाईंबद्दल प्रचलित आहे. १७९९ ते १८०१ या काळात कधीतरी यशवंतराव व तुळसाबाई यांची भेट झाली असावी असा तर्क नरहर फाटक देतात. (श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर) ही भेट उत्तरेत झाली कि खुद्द जेजुरीत याबाबत मात्र माहिती मिळत नसली तरी एकंदरित यशवंतरावांच्या हालचाली पाहता यशवंतरावांच्या पुणे स्वारीच्या दरम्यानच १८०२ मधे ही भेट झाली असेल असे म्हणता येते.

यशवंतरावांची तुळसाबाईंना पाठवलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. मल्हाररावांच्या लग्नानिमित्त तुळसाबाईंच्या नावे पाठवलेल्या दोन कुंकुमपत्रिका प्रसिद्ध असून नरहर फाटक म्हणतात कि उपस्त्रीला (रखेली) विवाहकार्याला निमंत्रण तत्कालीन स्थितीत दिले गेले नसते. अनेक पत्रांतही यशवंतरावांनी तुळसाबाईला "सौभाग्यवती" असे संबोधलेले आहे, त्यामुळे तुळसाबाई या विधीवत यशवंतरावांशी विवाहबद्ध झाल्या होत्या असे स्पष्ट दिसते.

तुळसाबाई स्वभावाने करारी, धैर्यवान व बुद्धीमान होत्या. तसे नसते यशवंतरावांच्या मृत्युनंतर मल्हारावाला मांडीवर बसवून राज्यकारभार त्यांना हाती घेता आला नसता. इंग्रजांच्या संदर्भातील तुळसाबाईंचा पेशव्यांशीही पत्रव्यवहार उपलब्ध असून त्यात त्यांच्या धोरणी राजकारणाचे दर्शन घडते. भीमाबाई व मल्हाररावांची कसलीही त्यांनी आबाळ केली नाही. भीमाबाई आपल्या सावत्र आईच्या राजकारणाला व मुत्सद्देगिरीला साथच देत असे. भीमाबाई व मल्हारराव जातीने​ ​ महिदपुरच्या​ ​ युद्धात उपस्थित होते यावरुन संस्थानाचे हित आपल्या सावत्र आईच्या मार्गदर्शनाखाली जपण्यात ही भावंडे अघाडीवर होते असे दिसते. तुळसाबाई, माल्कम व त्याची री ओढणारे इतिहासकार म्हणतात तशी बदफैली व व्यभिचारी असती तर सलग सात वर्ष तुळसाबाईंना राज्य करता येणे, वर्चस्व टिकवता येणे अशक्य झाले असते.

खरे तर यशवंतरावांचा मृत्यू झाल्यानंतर होळकरी राज्य सहज ताब्यात घेता येईल असा माल्कमचा होरा होता. त्याने त्यासाठी सुरुवातीपासून जी कटकारस्थाने केली त्याला तोड नाही.

मल्हाररावांचा रिजंट म्हणून तुळसाबाईंनी काम पहायला सुरुवात केली तेंव्हा ब्रिटिशांनीही मल्हाररावाचा वारसा मान्य करत पित्याच्या सा-या पदव्या वापरण्याचा अधिकार मान्य केला होता. तुळसाबाईने तात्या जोग, गणपतराव, अमिरखान, गफुरखान आणि जालीमसिंग या जुन्या सेवक तसेच यशवंतरावांच्या राजकीय मित्रांशी चांगले संबंध निर्माण केले. परंतू आपण अमिरखानाने यशवंतरावांशीही कशी छुपी दगाबाजी केली होती हे आधीच्या प्रकरणात पाहिलेच आहे. त्याला टोंकची जहागिरी यशवंतरावांनीच दिली होती. गफुरखान हा त्याचा मेव्हणा व होळकर दरबारातील त्याचा प्रतिनिधी. हा गफुरखान अमिरखानाला होळकर दरबारातील वित्तंबातम्या कळवत असे.

बाळाराम सेठ हा अजुन एक अधिकारी होता. गंगधर येथे त्याने तुळसाबाईला मल्हाररावांसहित थांबण्याचा आग्रह केला. परंतू त्यातील काळेबेरे लक्षात येताच तुळसाबाईंनी त्याला देहदंडाची शिक्षा दिली. आपले बिंग फुटले आहे कि काय या शंकेने गफुरखान व अन्य सरदार अस्वस्थ झाले. याची जानीव होताच तुळसाबाई अलोट येथे मल्हाररावांसह निघून गेल्या. म्हणजे तुळसाबाईंच्या सुरुवातीच्याच काळात त्यंना विश्वासघातांना तोंड द्यावे लागले.

आक्टोबर १८१३ मध्ये लोर्ड हास्टिंग्ज भारतात दाखल झाला. भारतातील स्थितीचा त्याने आढावा घेतला. मराठा राजमंडळातील सरदार पुन्हा एकत्र यायच्या प्रयत्नात आहेत व तुळसाबाईही त्यात सामील आहे हे त्याच्या लक्षात आले. होळकरांचे सैन्य त्याही काळात सर्वांत अधिक प्रबळ होते. बाजीरावावर अन्य सरदारांचा विश्वास नसला तरी पेशवेपदाचा मान होताच. त्यामुळे १ फेब्रुवारी १८१४ च्या पत्रात त्याने लिहिले कि ब्रिटिश साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी मध्य भारतात तातडीने असंतोष चिरडून टाकला पाहिजे. होळकर तसेच अन्य संस्थानिकांच्या सैन्याचा मुख्य आधार म्हणजे पेंढारी. त्यामुळेच ही इंग्रजांनी त्यांच्याहीविरुद्ध कारवाया करण्याचे निर्णय घेतले. पण यात होळकर, शिंदे आणि अमिरखान मोडता घालून मोठ्या प्रमाणावर बंड करतील अशी भितीही त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी कटकारस्थानाचाच वापर करायचा निर्णय घेतला व त्यांना एतद्देशिय देशद्रोह्यांनी साथ कशी दिली हे पुढील घटनाक्रमावरुन लक्षात येते.

या घटनाक्रमात तुळसाबाईंनी मराठा राजमंडलात राहुन ब्रिटिशांना विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पेशव्यांच्या दरबारी वकील पाठवून आपल्या तयारीची माहितीही दिली होती. तुळसाबाईला हटवल्याखेरीज होळकरी राज्य इंग्रजांना ताब्यात घेता येणार नव्हते. होळकरांची फौज बलाढ्य होती आणि यशवंतरावांनी ती प्रशिक्षीतही केली होती. त्यामुळे तुळसाबाईविरुद्ध इंग्रजांनी हळूहळू कटकारस्थाने सुरु केली. बदनामी करुनही कोणी बधत नाही म्हटल्यावर त्यांनी तुळसाबाईंचा खून करायचे ठरवले.

धर्मा कुंवर हा यशवंतरावांच्या विश्वासातील कारभारी होता. आधी त्यालाच फितवायचा प्रयत्न झाला, पण धर्मा कुंवरने दाद दिली नाही. मग इंग्रजांनी आपले लक्ष गफुरखानकडे वळवले. गफुरखान हा आमिरखानाचा होळकरांच्या दरबारातील प्रतिनिधी व सक्खा मेव्हना होता. होता. माल्कमने त्याला जाव-याची जागिर देण्याच्या बदल्यात विकत घेतले (९ नोव्हेंबर १७१७) आणि तुळसाबाई, मल्हारराव व अन्य होळकरी परिवाराला ठार करण्याचे कारस्थान रचले गेले. तुळसाबाई व मल्हारराव (३) ठार झाल्यानंतर झपाट्याने हालचाल करून राज्य गिळंकृत करण्याचे त्यांचे धोरण होते.

त्यानुसार गफुरखानाने संधी साधून तुळसाबाई व मल्हाररावांना अटक केली व त्यांना घेवुन जाव-याकडे निघाला. हत्याकांड होळकरी सीमेच्या बाहेर करावे अशी त्याची योजना असावी. पण यशवंतरावांचा विश्वासु सेनानी धर्मा कुंवरला हे कळताच त्याने गफुरखानाचा पाठलाग सुरु केला. गफुरखान व अमिरखानाशी त्याची लढाईही झाली, पण त्यात धर्माचा पराभव झाला. धर्माला शिरच्छेद करुन ठार मारण्यात आले. पण बोभाटा झाल्याने चित्र असे उभे केले गेले कि जणु धर्मानेच तुळसाबाई व मल्हाररावाला अटक केली होती व गफुरखानानेच त्यांना सोडवले. हा बेत फसल्याने हत्याकांडाची योजना त्यांना थोडी पुढे ढकलावी लागली. माल्कमने होळकरांनी ब्रिटिशांशी शिंद्यांनी केला तसाच ब्रिटिश सार्वभौमत्वाचा करार करावा असा लकडा लावला. तुळसाबाईंनी त्याला भिक घातली नाही.

मेजर माल्कम २६ नोव्हेंबर १८१७ रोजी तालेन येथे आपले सैन्य घेऊन आला. युद्ध करायचे आधीच ठरलेले होते. खुनाचा एक प्रयत्न फसला होता. नवी योजना आखण्याची गरज होती.  दरम्यान इंग्रजांच्या हालचालींची खबर लागल्याने तुळसाबाईंनीही ब्रिटिशांशी युद्धाचा निर्णय घेतला. तात्या जोग, जो ब्रिटिशांशी समझौता करावा या मताचा होता त्याला पदावरुन हाकलुन नजरकैदेत ठेवले. मल्हारराव, भीमाबाई व सर्व सेनानी महिदपुरकडे ससैन्य निघाले होते. गफूरखान तेवढा मागे राहिला होता. त्याचे सैन्य मात्र मल्हाररावांसोबत रवाना झाले होते. या वेळीस होळकरांकडे शंभर तोफा, पंधरा हजार घोडदळ व दहा हजारांचे प्रशिक्षित पायदळ होते.

यामुळे माल्कम पुन्हा तुळसाबाईंशी तह करण्याच्या मागे लागला. १५ डिसेंबर रोजी होळकरांच्या तीन वकिलांशी त्याने वाटाघाटी करायचा निष्फळ प्रयत्न केला. या वाटाघाटीतुन काहीही निष्पन्न होत नाही हे लक्षात आल्यावर नेमके १९ डिसेंबर रोजीच त्यांनी वकिलांची परत रवानगी केली. कारण तुळसाबाई आहे तोवर आपला निभाव लागत नाही हे माल्कमच्या लक्षात आले होतेच आता खात्री पटली. पण दुर्दैवी भाग म्हणजे अमिरखानाने या आधीच, ९ नोव्हेंबर रोजी, इंग्रजांशी तह करुन टाकला होता. माल्कमच्या दृष्टीने ती जमेची बाजु होती. अमिरखानाचा मेव्हणा गफुरखान तर आधीच इंग्रजांना आतून मदत करत होता.

महिदपुरच्या लढाईचा आद्ल्या दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर १७१७ च्या रात्री गफुरखानने डाव साधला. सारे सैन्य, भिमाबाई-मल्हारराव राजधानीत नव्हते. त्याने ही संधी साधली. यासाठीच तो मागे राहिला होता. त्याने महालात अचानक आपली तुकडी घुसवली. तुळसाबाईंना त्यांच्या महालातुन बाहेर काढले, क्षिप्रा नदीच्या काठी नेले व त्यांचा शिरच्छेद करुन त्यांना ठार मारले. त्यांचे प्रेत नदीत फेकुन देण्यात आले. त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही. हत्याकांड होताच गफुरखान तातडीने महिदपुरच्या दिशेने रवाना झाला.

ब्रिटिशांशी तुळसाबाईलाच तह करायचा होता म्हनून तिला ही गफुरखानाने शिक्षा देण्यात आली असे माल्कमने लिहिले. तो शत्रुच होता. तह करायचा असता तर महिदपुरला सैन्य कशाला पाठवले असते हा प्रश्न आमच्या इतिहासकारांना पडला नाही. सात वर्ष ब्रिटिशांच्या पापी नजरेतून राज्य वाचवले या योग्यतेचे स्मरण केले नाही. वरील घटनाक्रम पाहिला, तुळसाबाईला ठार मारण्याचे दोन अयशस्वी आणि एक यशस्वी प्रयत्न पाहिला तर तुळसाबाई इंग्रजांच्या डोळ्यांत केवढी सलत असेल याची कल्पना येते.

गफुरखानाचे पाप येथेच संपले नाही. तो तुलसाबाईंना ठार मारुन महिदपुरला गेला. २० डिसेंबर रोजी सुरु झालेल्या युद्धात दुपारपर्यंत होळकर जिंकतील असे चित्र असतांना दुपारीच तो अचानक आपले सैन्य घेऊन पळून गेला. त्यामुळे होळकरांचा तेथे पराभव झाला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते. 

यशवंतरावांच्या दुर्दैवी निधनापासून तब्बल सात वर्ष इंग्रजांना होळकरी सीमांपासून दूर ठेवणारी ही मुत्सद्दी महिला. सात वर्ष होळकरी संस्थानाचा घास घ्यायला टपलेल्यांना दूर ठेवणे ही सामान्य बाब नव्हे. पण इतिहासाने महाराणी तुळसाबाईंची यथोचित दखल घेणे तर सोडाच, तिला रखेली, बदफैली ठरवण्याचा प्रयत्न केला. तसे करणे माल्कमच्या किंवा इंग्रजांच्या दृष्टीने स्वाभाविक असले तरी आम्हा पामरांना तरी तुळसाबाईचे महत्व समजायला हवे होते. "नाही चिरा नाही पणती" अशे अवस्था एका समर्थ महाराणीची झाली. विश्वासघातकी मृत्यू स्विकारावा लागला. इंग्रज मात्र खूष होते...उरलले सुरले होळकरी सामर्थ्य नष्ट करण्यात ते यशस्वी होत आले होते. पण सरळ मार्गाने त्यांना अजुनही विजय मिळवण्याची खात्री नव्हती. पण त्यांचे नशीब थोर एवढे कि गफुरखानासारखे घरभेदी त्यांना मिळतच चालले होते.

आणि नीतिहीन लोलुपांची कमी कधी असते काय?

-​ संजय सोनवणी ​

Tuesday 17 March 2015

पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर

पुण्यश्लोकी राजमाता । अष्टावधानी लोकमाता । 
रणरागिणी कर्मयोगिनी । दिन-दुबळ्यांची त्राता । 
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Thursday 6 November 2014

Maharaja Yashwant Rao Holkar

H.H. Maharajadhiraj Raj-Rajeshwar Sawai Shrimant Yashwant Rao Holkar 
(Born - 03 December 1776, Coronation - 06 January 1799, Died - 28 October 1811)

Thursday 23 October 2014

राजमाता अहिल्यादेवी होळकर


राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे स्त्रीशक्तीचा आणि उदात्त मानवी मूल्यांचा सर्वोच्च अविष्कार होय. दि. ३१ मे १७२५ रोजी त्यांचा जन्म चौंडी (जि. नगर) येथील माणकोजी शिंदे या धनगर समाजातील पाटलांच्या घरात झाला. मराठेशाहीचे आधारस्तंभ असलेल्या मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेरावांसोबत वयाच्या ८ व्या वर्षी म्हणजे इ.स. १७३३ साली त्यांचा विवाह झाला. पुत्र मालेराव व कन्या मुक्ताबाई यांच्या रुपाने त्यांची संसारवेल बहरत असतनाच पती खंडेरावांचे कुंभेरीच्या मोहिमेवर असताना निधन झाले अन अहिल्यादेवींना अकाली वैधव्य आले.

पती निधनानंतर सती जाण्याच्या अघोरी प्रथेच्या कालखंडात आणि स्त्री म्हणजे उंबरठ्याच्या आतील मर्यादित वस्तु असा समज असणार्‍या परिस्थितीत अहिल्यादेवींनी अघोरी अंधश्रद्धा आणि कर्तृत्वाच्या आड येणार्‍या सामाजिक बंधनाच्या शृंखला उध्वस्त करुन प्रजाजनांच्या सर्वात्मक कल्याणासाठी अविरत कष्ट केले. म्हणून तर त्या नारीशक्तीच्या उर्जेचे, कर्तृत्वाचे उत्तुंग मापदंड ठरलेल्या आहेत. पती खंडेरावांच्या निधनानंतर आलेले अकाली वैधव्य, एकुलता एक पुत्र मालेरावांचे तसेच जावई यशवंतराव फणसे यांचा मृत्यू. त्यानंतर मुलगी मुक्ताबाईचे सती जाणे, मार्गदर्शक सासरे मल्हारराव होळकर यांचे निधन या सर्व गहिर्‍या दु:खाने या मायमाऊलीच्या काळजाला किती तरी पराकोटीच्या विषडंखी वेदना झाल्या असतील याची कल्पनाही करवत नाही. मात्र दु:खाच्या वणव्यातसुद्धा स्वत:च्या प्रजाहितदक्ष व समाजहितकारी कर्तव्यांना प्राणपणाने जपत या मायमाऊलीने काळालाही लाजवेल असा राज्यकारभार केला. प्रापंचिक सुखाची परमेश्‍वराने सर्वात मोठी शोकांतिका करुनही प्रजेवर सुखांतिका बरसवणारी जगाच्या ज्ञात इतिहासातील एकमेवाद्वितीय राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवीच होय.

लढाया किंवा युद्धे प्रत्यक्ष तलवारीनेच लढली जातात असे नाही तर राजकारणातील चातुर्य आणि मुत्सद्दीपणाने रक्ताचा एकही थेंब वाया न घालवतासुद्धा लढता येतात याचा आदर्शपाठच त्यांनी घालून दिला. सासरे मल्हारराव होळकरांच्या मुशीत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. ११ डिसेंबर १७६७ रोजी राज्यकारभारावर आरुढ होताना अहिल्यादेवींनी केलेली प्रतिज्ञा म्हणजे प्रजाकल्याणाच्या अंतिम ध्येयाच्या सौंदर्याचा जणू साक्षात वेदच होता,

# माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
# माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत: जबाबदार आहे
# सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे
# त्या प्रत्येक कृतीचा जाब मला परमेश्‍वरापुढे देणे आहे.
# परमेश्‍वराने ज्या जबाबदार्‍या माझ्यावर सोपवल्या आहेत,
# त्या मला पार पाडावयाच्या आहेत.

आसेतूहिमाचल पसरलेल्या हिंदुस्थानातील शेकडो देवस्थानांचा त्यांनी उद्धार केला. रस्ते, विहिरी, तलावे, नदीघाट, धर्मशाळा अशी कित्येक लोकोपयोगी कामे त्यांनी केली. अहिल्यादेवींइतकी अमाप संपत्ती तत्कालीन मराठेशाहीत कोणाकडेही नव्हती. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महादजी शिंदेना तब्बल ३० लाख रुपये कर्जाऊ दिले होते. पेशवाईला त्यांच्याविषयी दरारायुक्त आदर होता. स्वत:च्या खर्चावर मर्यादा घालणार्‍या या मायमाऊलीने जनताजनार्दनाच्या कल्याणासाठी दोन्ही हातांनी अखंड दानधर्म केला.

राष्ट्र आणि समाज घडविणार्‍या महापुरुषांकडे कोणत्या तरी जातीधर्माच्या भिंगातून पाहण्याची घातकवृत्ती सध्याच्या काळात निर्माण होतेय. या महापुरुषांना ठराविक वर्गाचा शिक्का मारुन त्यांना संकुचित चौकटीत बंदिस्त करुन त्यांच्या लोककल्याणकारी कामाकडे दुर्लक्ष्य केले जात आहे. अशा विचित्र परिस्थितीमुळे कित्येक महापुरुषांची व्यक्तिमत्त्वं गुदमरल्यासारखी झालीत. अहिल्यादेवींच्या बाबतीत सुद्धा हेच घडत आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व एखाद्या जातीधर्मापुरते अथवा देशापुरते सीमित राहण्याएवढे नक्कीच मर्यादित नाही. त्यांच्या कर्तृत्वाची दखल भारतीय इतिहासकारांइतकीच पाश्‍चिमात्य इतिहासकारांनीदेखील घेतली आहे. लॉरेन्स या प्रसिद्ध ब्रिटिश ग्रंथकाराने अहिल्यादेवींची तुलना इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ, डेन्मार्कची सम्राज्ञी मार्गारेट व रशियाची राणी क्याथराईन यांच्याशी केली आहे.

सापेक्षी संशोधनासाठी प्रसिद्ध असलेला इतिहासकार अबराय म्याके हा लिहितो, ‘‘सर्व जगाला सन्मार्ग व सुख देण्याकरता निर्माण झालेली अहिल्यादेवी ही सर्वगुणसंपन्न स्त्री परमेश्‍वराची तर अपूर्व देणगीच होती. किंबहुना ती तेजोमय देवताच होती. ही लोकोत्तर स्त्री आपली अपूर्व धर्मशीलता, निस्सीम कार्यशीलता व प्रशंसनीय उद्यमशीलता या सद्गुणांच्या आधारे हिंदुस्थानातीलच नव्हे तर कोणत्याही राष्ट्रातील स्त्रीजातीच्या तेजस्वी रत्नावलीत विराजमान होेण्यासारखी आहे.’’ धर्म हा माणसाच्या आचारविचाराचा अन संस्काराचा जीवनगाभा असून माणसाला अध्यात्मिक अनुभूतीचा स्पर्श विनासायास घडावा म्हणून तर अहिल्यादेवींनी भारतभर रचनात्मक धर्मकार्य केले. जगाच्या इतिहासात अनेक राजसत्तांचा उदयास्त झाला. कित्येक सत्ता तलवारीच्या खडखडाटीने तर काही सत्ता फंदफितुरी व अनन्वित अत्याचाराने गाजल्या. पण स्त्रीशक्तीच्या सर्वोच्च एकखांबी आविष्काराचे सोज्वळ व तितकेच करारी प्रतिबिंब उमटले ते फक्त होळकरशाहीमध्ये.

स्वतंत्र छत्रचामर, स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र सिंहासन धारण करणार्‍या अहिल्यादेवी महाराणी तर होत्याच पण ‘इद न मम:’ या विरक्त वृत्तीने राज्यकारभार करणार्‍या त्या खर्‍या कर्मयोगिनी होत्या. प्रापंचिक जीवन नियतीच्या आभाळात पाचोळ्यासारखे उडून गेल्यावरही सर्वजनांच्या कोटकल्याणाचे ‘सुंबरान’ शिवाकडे मागणार्‍या त्या महान ‘राजमाता’ होत्या. पुण्याचे संचयन स्वत:साठी करणार्‍या ‘मानव’ त्या नक्कीच नव्हत्या तर स्वत:च्या पुण्यसंचयनातून महन्मंगल श्‍लोकांच्या पावित्र्याचा समाज घडविणार्‍या त्या ‘पुण्यश्लोक’ होत्या. अहिल्यादेवी रुढ अर्थाने देवताही नव्हत्या. तुमच्या-आमच्यासारख्या मानवच होत्या. मानुषपणाचे सर्व मनोव्यापार त्यांच्याही बाबतीत घडले पण मध्ययुगीन कालखंडाच्या पार्श्‍वभूमीवर एक स्त्री असतानाही तब्बल २५ वर्षाच्या धुरंधर राज्यकारभारातील त्यांच्या कर्तृत्वाचा लखलखता आलेख पाहून ‘देवत्व’ आणि ‘मनुष्यत्व’ यातील सीमारेषा त्यांच्याबाबतीत पुसट होऊन जातात. अहिल्यादेवींचे चरित्र आणि माजघरातील देव्हारा यांच्यात अद्वैत होऊन जातं…

- श्री. प्रमोद प्रकाश धायगुडे, वाघोशी

Tuesday 18 March 2014

Devi Ahilyabai Holkar Award - 2013 (By Government Of India)


The President, Shri Pranab Mukherjee presenting the “Devi Ahilyabai Holkar Award” to Dr. Seema Sakhare (Maharashtra), at the presentation of Stree Shakti Puraskar 2013 on the occasion of International Women’s Day, at Rashtrapati Bhavan, in New Delhi on March 08, 2014.

08 मार्च, 2014 को राष्‍ट्रपति भवन नई दिल्‍ली में अंतर्राष्‍ट्रीय महिला दिवस पर स्‍त्री-शक्ति पुरस्‍कार-2013 प्रदान करने के मौके पर डॉ. सीमा साखरे (महाराष्‍ट्र) को देवी अहिल्‍याबाई होल्‍कर पुरस्‍कार प्रदान करते हुए राष्‍ट्रपति श्री. प्रणब मुखर्जी

Friday 21 February 2014

एक दुर्लक्षित दिनविशेष : २१ फेब्रुवारी - विठोजीराजे होळकर जयंती

२१ फेब्रुवारी ह्या दिवसाचे अनेक ज्ञात दिनविशेष असतील. पण याच दिवसाचा एक दुर्लक्षित दिनविशेषही आहे. होळकर राज-घराण्यातील श्रीमंत सुभेदार तुकोजीराव (प्रथम) यांचे पुत्र तसेच महाराजाधिराज राज राजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे बंधू विठोजीराजे होळकर यांची आज जयंती !!!

Thursday 20 February 2014

महाराजा यशवंतराव होलकर


जन्म - ०३ दिसम्बर १७७६ । देहांत - ११ अक्टूबर १८११ । राज्याभिषेक - ०६ जनवरी १७९९ । 

एक ऐसा भारतीय शासक जिसने अकेले दम पर अंग्रेजों को नाकों चने चबाने पर मजबूर कर दिया था। इकलौता ऐसा शासक, जिसका खौफ अंग्रेजों में साफ-साफ दिखता था। एकमात्र ऐसा शासक जिसके साथ अंग्रेज हर हाल में बिना शर्त समझौता करने को तैयार थे। एक ऐसा शासक, जिसे अपनों ने ही बार-बार धोखा दिया, फिर भी जंग के मैदान में कभी हिम्मत नहीं हारी।

इतना महान था वो भारतीय शासक, फिर भी इतिहास के पन्नों में वो कहीं खोया हुआ है। उसके बारे में आज भी बहुत लोगों को जानकारी नहीं है। उसका नाम आज भी लोगों के लिए अनजान है। उस महान शासक का नाम है - यशवंतराव होलकर। यह उस महान वीरयोद्धा का नाम है, जिसकी तुलना विख्यात इतिहास शास्त्री एन एस इनामदार ने 'नेपोलियन' से की है। भास्कर नॉलेज पैकेज के अंतर्गत आज हम आपको इसी वीर योद्धा के बारे में बताने जा रहे हैं।

पश्चिम मध्यप्रदेश की मालवा रियासत के महाराज यशवंतराव होलकर का भारत की आजादी के लिए किया गया योगदान महाराणा प्रताप और झांसी की रानी लक्ष्मीबाई से कहीं कम नहीं है। यशवतंराव होलकर का जन्म 1776 ई. में हुआ। इनके पिता थे - तुकोजीराव होलकर। होलकर साम्राज्य के बढ़ते प्रभाव के कारण ग्वालियर के शासक दौलतराव सिंधिया ने यशवंतराव के बड़े भाई मल्हारराव को मौत की नींद सुला दिया।

इस घटना ने यशवंतराव को पूरी तरह से तोड़ दिया था। उनका अपनों पर से विश्वास उठ गया। इसके बाद उन्होंने खुद को मजबूत करना शुरू कर दिया। ये अपने काम में काफी होशियार और बहादुर थे। इसका अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि 1802 ई. में इन्होंने पुणे के पेशवा बाजीराव द्वितीय व सिंधिया की मिलीजुली सेना को मात दी और इंदौर वापस आ गए।

इस दौरान अंग्रेज भारत में तेजी से अपने पांव पसार रहे थे। यशवंत राव के सामने एक नई चुनौती सामने आ चुकी थी। भारत को अंग्रेजों के चंगुल से आजाद कराना। इसके लिए उन्हें अन्य भारतीय शासकों की सहायता की जरूरत थी। वे अंग्रेजों के बढ़ते साम्राज्य को रोक देना चाहते थे। इसके लिए उन्होंने नागपुर के भोंसले और ग्वालियर के सिंधिया से एकबार फिर हाथ मिलाया और अंग्रेजों को खदेड़ने की ठानी। लेकिन पुरानी दुश्मनी के कारण भोंसले और सिंधिया ने उन्हें फिर धोखा दिया और यशवंतराव एक बार फिर अकेले पड़ गए।

उन्होंने अन्य शासकों से एकबार फिर एकजुट होकर अंग्रेजों के खिलाफ लड़ने का आग्रह किया, लेकिन किसी ने उनकी बात नहीं मानी। इसके बाद उन्होंने अकेले दम पर अंग्रेजों को छठी का दूध याद दिलाने की ठानी। 8 जून 1804 ई. को उन्होंने अंग्रेजों की सेना को धूल चटाई। फिर 8 जुलाई, 1804 ई. में कोटा से उन्होंने अंग्रेजों को खदेड़ दिया।

11 सितंबर, 1804 ई. को अंग्रेज जनरल वेलेस्ले ने लॉर्ड ल्युक को लिखा कि यदि यशवंतराव पर जल्दी काबू नहीं पाया गया तो वे अन्य शासकों के साथ मिलकर अंग्रेजों को भारत से खदेड़ देंगे। इसी मद्देनजर नवंबर, 1804 ई. में अंग्रेजों ने दिग पर हमला कर दिया। इस युद्ध में भरतपुर के महाराज रंजित सिंह के साथ मिलकर उन्होंने अंग्रेजों को उनकी नानी याद दिलाई। यही नहीं इतिहास के मुताबिक उन्होंने 300 अंग्रेजों की नाक ही काट डाली थी।

अचानक रंजित सिंह ने भी यशवंतराव का साथ छोड़ दिया और अंग्रजों से हाथ मिला लिया। इसके बाद सिंधिया ने यशवंतराव की बहादुरी देखते हुए उनसे हाथ मिलाया। अंग्रेजों की चिंता बढ़ गई। लॉर्ड ल्युक ने लिखा कि यशवंतराव की सेना अंग्रेजों को मारने में बहुत आनंद लेती है। इसके बाद अंग्रेजों ने यह फैसला किया कि यशवंतराव के साथ संधि से ही बात संभल सकती है। इसलिए उनके साथ बिना शर्त संधि की जाए। उन्हें जो चाहिए, दे दिया जाए। उनका जितना साम्राज्य है, सब लौटा दिया जाए। इसके बावजूद यशवंतराव ने संधि से इंकार कर दिया।

वे सभी शासकों को एकजुट करने में जुटे हुए थे। अंत में जब उन्हें सफलता नहीं मिली तो उन्होंने दूसरी चाल से अंग्रेजों को मात देने की सोची। इस मद्देनजर उन्होंने 1805 ई. में अंग्रेजों के साथ संधि कर ली। अंग्रेजों ने उन्हें स्वतंत्र शासक माना और उनके सारे क्षेत्र लौटा दिए। इसके बाद उन्होंने सिंधिया के साथ मिलकर अंग्रेजों को खदेड़ने का एक और प्लान बनाया। उन्होंने सिंधिया को खत लिखा, लेकिन सिंधिया दगेबाज निकले और वह खत अंग्रेजों को दिखा दिया।

इसके बाद पूरा मामला फिर से बिगड़ गया। यशवंतराव ने हल्ला बोल दिया और अंग्रेजों को अकेले दम पर मात देने की पूरी तैयारी में जुट गए। इसके लिए उन्होंने भानपुर में गोला बारूद का कारखाना खोला। इसबार उन्होंने अंग्रेजों को खदेड़ने की ठान ली थी। इसलिए दिन-रात मेहनत करने में जुट गए थे। लगातार मेहनत करने के कारण उनका स्वास्थ्य भी गिरने लगा। लेकिन उन्होंने इस ओर ध्यान नहीं दिया और 28 अक्टूबर 1811 ई. में सिर्फ 35 साल की उम्र में वे स्वर्ग सिधार गए।

इस तरह से एक महान शासक का अंत हो गया। एक ऐसे शासक का जिसपर अंग्रेज कभी अधिकार नहीं जमा सके। एक ऐसे शासक का जिन्होंने अपनी छोटी उम्र को जंग के मैदान में झोंक दिया। यदि भारतीय शासकों ने उनका साथ दिया होता तो शायद तस्वीर कुछ और होती, लेकिन ऐसा नहीं हुआ और एक महान शासक यशवंतराव होलकर इतिहास के पन्नों में कहीं खो गया और खो गई उनकी बहादुरी, जो आज अनजान बनी हुई है।

संदर्भ - दैनिक भास्कर

Tuesday 18 February 2014

होलकर राजवंश के १४ गौरवशाली नरेश

होलकर वंश को राज्यप्राप्ति - २६ मई १७२८ 
 होलकर राज्य का भारतीय संघ में विलय - १६ जून १९४८
शासनावधि - २२० वर्ष २२ दिन

Thursday 6 February 2014

सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा - 'मल्हारतंत्र'


श्रीमंत सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचा सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा अर्थात 'मल्हारतंत्र' ! 'सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा', ‘होळकरांचा-गनिमीकावा', 'होळकरी-कावा' किंवा 'मल्हारतंत्र' अशा अनेक नावांनी परिचित असलेला गनिमीकाव्याचा हा प्रकार 'मल्हारतंत्र' या नावानेच जास्त ओळखीचा आहे.

मल्हारबांच्या घोड्यांच्या टापांनी जवळपास अवघा भारत पिंजून काढला. मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे गरुडस्तंभ ठरलेल्या मल्हाररावांनी अनेक युद्धात हेच तंत्र वापरले. दिल्लीच्या तख्तावर वर्चस्व ठेवले. त्यांच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनीही पुढे याचाच वापर केला. मॉन्सनचा भीषण पराभव हे देखील याचेच उदाहरण !

होळकरांच्या या तंत्राविषयी प्रसिद्ध इतिहासकार श्री. यशवंत वासुदेव खरे (ऐतिहासिक लेख संग्रह - १५) लिहितात  -  “होळकरांचा गनिमीकावा विचित्र होता.  मैदानात समोरासमोर इंग्रजाशी लढण्याच्या भानगडीत पडत नसे. पहिल्याने घोडेस्वाराच्या लहान लहान टोळ्या दिसू लागत या लहान टोळ्याच्या पाठीशी घोडेस्वाराच्या मोठमोठ्या टोळ्या असत. इंग्रजी फौज चालून आली तर हे घोडदळ पळू लागे. इंग्रजी फौजेची पाठ वळताच हजारो मराठे घोडेस्वार चहूकडून हल्ले करीत आणि पिछाडीवर लांडगेतोड करीत. शत्रूभोवती घिरट्या घाल घालून मराठे संधी सापडेल तेंव्हा शत्रूची कत्तल करीत...” (सदर पुरावा उपलब्ध करून दिला तो आमचे पुणे स्थित मित्र सचिन शेंडगे यांनी…)

प्रसिध्द इतिहास संशोधक व लेखक श्री. संजय सोनवणी यांचे देखील मल्हारतंत्राविषयी मत आपण जाणून घेऊयात, त्यांच्या 'धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड' या त्यांच्या प्रकाशित लेखामध्ये ते लिहितात - "मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली."

तसेच श्री. संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरीत्र पुस्तकात ते लिहितात - "यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो हे खोटे आहे, हे त्यांनी सिध्द करुन दाखवले. मॉन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा खरेतर होळकरी-काव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युध्दशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पाळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून, भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत, तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत न्हेत कसे संपवावे, याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारां पेक्षाही अधिक ठार झाले."

तरी देखील गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो असे म्हणणाऱ्यांना काय म्हणावे ?

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Monday 13 January 2014

A PORTRAIT OF TUKOJI HOLKAR SMOKING A HUQQA UNDER A CANOPY, DELHI, EARLY 19TH CENTURY.

"Gouache With Gold On Paper, Inscription Of Identification In Nast'aliq At Upper Centre 'Takoji Howalkar Subedar', Mounted On An Album Page With Borders Of Stout Cream Paper Decorated With Gold Flowers, Reverse With An Inscription In An English Hand In Brown Ink (Probably William Fraser's Hand)" Painting: 28cm X 19cm. Leaf: 45.9cm X 30.4cm.

Friday 10 January 2014

H. H. Maharajadhiraj Raj Rajeshwar Sawai Shri Yashwant Rao (II) Holkar XIV Bahadur (Maharaja Of Indore) With His Hunting Team, After A Hunt.


A Rare Photograph Of H. H. Maharajadhiraj Raj Rajeshwar Sawai Shri Yashwant Rao II Holkar XIV Bahadur (Maharaja Of Indore) As A Kid, During The Royal Ceremony, Indore, India.

 (Photo Date - 09 November 1916)

H.H. Maharajadhiraj Raj Rajeshwar Sawai Shri Yeshwantrao II Holkar XIV Bahadur (Maharaja of Indore) With Maharani & Prince Richard.


Maharajkumar Shrimant Richard Shivajirao Holkar Bahadur With Wife Sally Holkar, 1966.


One Of The Best Architectural Work Of 17th Century At The Ahilya Fort, Maheshwar, Madhya-Pradesh.


(Courtesy- http://static.panoramio.com/photos/large/78606913.jpg)

Statue Of Punyashlok Rajmata Maharani Ahilyadevi Holkar At The Ahilya Fort, Maheshwar, Madhya-Pradesh.


'Chatri Of Shrimant Subhedar Thorale Malhar Rao Holkar', Alampur, Madhya-Pradesh.


H.H. Maharajadhiraj Raj Rajeshwar Sawai Shri Yeshwantrao II Holkar XIV Bahadur (Maharaja of Indore) With H.H. Maharani Shrimant Akhand Soubhagyavati Sanyogita Bai Sahib Holkar & One Guest


Punyashlok Rajmata Maharani Ahilyadevi Holkar Powada, Written By Famous Marathi Shahir Prabhakar...!!!


सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ ध्रुवपद ॥  महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी । सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्‍नखाणी । दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी । वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥चाल॥उद्धार कुळाचा केला । पण आपला सिद्धिस नेला । महेश्वरास जो कुणी गेला ॥चाल पहिली॥ राहिला तेथे तो घेउन बाप भाई । संसार चालवी दीन दुबळ्यांची आई ॥१॥ 

प्रत्यही द्यावी ब्राह्मणास दश दाने । ऐकावी पुराणे बहुत आनंदाने । लाविली हरी हर मंदिरी तावदाने । गर्जती देउळे कीर्तन नादाने ॥ शोभती होम कुंडे द्विजवृंदाने । टाकिती हजारो नमात अवदाने ॥चाल॥ कधी कोटि लिंगे करवावी । वधुवरे कधि मिरवावी । अर्भका दुधे पुरवावी ॥चा०प०॥ पर्वणी पाहुन दान देतसे गाई । जपमाळ अखंडित हाती वर्णू काई ॥२॥

जेथे ज्योतिलिंग जेथे तीर्थ महा क्षेत्रे । घातली तेथे नेहमीच अन्नछत्रे । आलि जरा झालि काही ज्याची विकल गात्रे । पुरवावी त्यास औषधे वस्त्रे पात्रे । कितिकांनी घेतली स्मार्त अग्निहोत्रे । दिली स्वास्थे करुन त्या भटास क्षणमात्रे ॥चाल॥ आधि इच्छा भोजन द्यावे । उपरांतिक तीर्थ घ्यावे । वाढून ताट वर मग न्यावे ॥चा०प०॥ जेविल्या सर्व मग आपण अन्न खाई । रघुवीर चरित्रे रात्रीस गोड गाई ॥३॥

आल्या यात्रेकर्‍याला वाटी पंचेजोडे । कोणास आंगरखे कोणास नवे जोडे । कोणास महेश्वरी उंच धोत्रजोडे । कोणास दुशाला कोणास बट घोडे । गवयास मिळाति कडी कंठ्या तोडे । घाली गिराशांचे पायात बिड्या खोडे ॥चाल॥ बांधिले घाट मठ पार । कुठे शिवास संतत धार । कुठे वनात पाणी गार ॥चाल पहिली॥ त्यासाठी मुशाफर काय धावत जाई । विश्रांत पावती पाहुन अमराई ॥४॥

किती सूर्य ग्रहण संधीत तुळा केल्या । कधी कनक रौप्य कधी गुळाच्या भेल्या । संभाळ करून काशीस यात्रा नेल्या । कावडी शतावधी रामेश्वरी गेल्या । संसारी असुन वासना जिच्या मेल्या । तिजपुढे सहज मग मुक्ति उभ्या ठेल्या ॥चाल॥ कवी गंगु हैबती म्हणती ॥ पुण्याची कोण करी गणती ॥ राज्यास होती पडपण ती ॥चा०प०॥ महादेव गुणीचे लक्ष तिचे पाई । कवनात प्रभाकर करितसे चतुराई ॥५॥

H.H. Maharaja Yashwant Rao Holkar Powada, Written By Famous Marathi Shahir Anant Fandi In 18th Century...!!!


मराठीतील प्रसिद्ध कवी / शाहीर अनंत फंदी यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर रचलेला पोवाडा…!!! 

सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥ध्रुवपद॥  वडील नावकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । जे सावध होते परंतु सर्यत केली सरतासरती । भाऊ यशवंतराव बहादर ऐकून घ्याया ह्या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दों वर्षांमधिं घ्या गणती । बनकस कंपू पठाण कडिये फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देति लढावुन टोपीवाले नाहीं गणती । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बाहेरी ॥सुभे०॥१॥ 

शहर पुण्याशीं यावें ऐसा विचार ठरला फौजेचा । दरकूच घेउनि आघाडी मुकाम केला फलटणचा । मागून दुसरा गोलपठाणशाह आमदखान मीरखानचा । मार्गीं येतां लढाई संग्राम झाला टोपीवाल्याचा । उद्यां लढाई दुसरी नेमिली आला हलकारा लष्करचा । खाशासुद्धां करुनि तयारी मुकाम केला जेजूरिचा किं मल्हाराचें दर्शन घ्यावें मग निर्दाळावे वैरी ॥सुभे०॥२॥ 

सोमवारच्या दिवशीं प्रातःकाळीं लढाई नेमिली । फत्तेसिंगमानी यांणीं तल्लख लिहून पाठविली । अशी लढाई करा म्हणावें मागें मोहरें नाहीं जाहली । टोपीवाले फार हरामी त्यांनीं बहु धुंद केली । सवाई यशवंतराव जाऊन अंगें तरवार चमकविली । दोन लाख फौजेमधिं जाऊन कणसापरि कत्तल केली । तमाम कंपू पळ सुटला चहूंकडे गेले हो पेंढारी ॥सुभे०॥३॥ 

सवाई मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । बेफाम होते परंतु भली केली सरतांसरती । सवाई यशवंतराव बहादर ऐकून ध्याव्या या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दोप्रहरांमधिं ध्या गणति । बंक कंपु पठाण कडवे फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देती लुढावून टोपीवाले नाहीं गणती । फत्तेसिंग मान्या कुलअखत्यारी ऐकुनि घ्या या शूर मूर्ति । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बहिरी । जसा कृष्ण अवतार मुरारी गोपिकांवर कृपा करी ॥सुभे०॥४॥

सुभेदार महाराज प्रतापी नामें ऐक एक मोहोरा । कारभारी ऐकुनि घ्यावे हरनाथाचा कुलकल्ला । शहर पुण्याची नाकेबंदी वागुं देईना पसारा । खटमार मोठा कठिण नाहीं कुठें ऐकिली तर्‍हा । मार देउनि खंडण्या घेतो चौमुलखामधिं दरारा । वडिला वडिलीं पुरुषार्थ महिमा सवाई यशवंतराव जुरा । अनंद फंदीचे छंद ऐकतां लढाई झाली ही सारी । सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥सुभे०॥५॥

महाराजाधिराज राज-राजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर

 जन्म: ०३ डिसेंबर १७७६, मृत्यू: २८ ऑक्टोबर १८११
वैदिक राज्याभिषेक: ०६ जानेवारी १७९९
 ("जीन घर : जीन तख्त …" साठी आभार: सचिन शेंडगे, पुणे)

Indore's Holkar State Stamp Of One Anna, Colour: Pink, With Image Of H.H. Maharaja Tukoji Rao (II) Holkar.


Jewelled Sword Of The Holkar Maharaja, 18th Century,

Place Of Origin: Indore (India),
Current Location: Victoria and Albert Museum, London.
Medium & Techniques: Steel, Gold, Diamonds, Emeralds & Rubies. 
Measurements: Overall Length: 94.5 cm. 
Details: The Parasol, An Emblem Of Kingship, Overlaid In Gold On The Blade. The Gold Hilt Is Embellished With 276 Diamonds, 378 Rubies And 38 Emeralds.

General Outlines Of The Ahilya Fort, Maheshwar (Madhya-Pradesh).


 (Source: Kamath Design Studio)

An Aerial View Of The Ahilya Fort, Maheshwar (Madhya-Pradesh). Viewer Can Imagine The Wideness Of Fort...Its Simply Great...!!!



महाराजा यशवंतराव होळकर यांच्या मुद्रेवरील मजकूर


 (संदर्भ: 'महाराजा यशवंतराव होळकर' लेखक: संजय सोनवणी)

Photograph Of The Ahilya Fort, Maheshwar By Anupam Mukherjee


Thursday 9 January 2014

The Statue Of Punyashlok Rajmata Maharani Ahilyadevi Holkar at Rang-Mahal, Chandwad (Rang-Mahal had built By Maharani Ahilyadevi, During Her Rule)


अति सुशील वह कन्या थी, अरु नाम अहिल्याबाई था।
मुखमंडल की ज्योती देखकर, भास्कर भी शरमाता था। 

पुण्यश्लोक राजमाता महारानी अहिल्यादेवी होलकरजी की रंग-महाल, चांदवड (महाराष्ट्र) स्थित मूर्ति। यह रंग-महाल अहिल्यादेवीजी ने अपने शासनकाल में बनवाया था। आजभी यह भव्य रंग-महाल, उस सुवर्णकाल का गौरवशाली इतिहास का अनुभव करवाता है ।


H. H. Maharajadhiraj Raj Rajeshwar Sawai Shri Sir Tukoji Rao II Holkar XI Bahadur (Maharaja Of Indore)

Birth: 03 May 1835, Died: 17 June 1886,
Rule: 27 June 1844 To 17 June 1886
(Courtesy of - www.ajay22red.blogspot.com)

Main Entrance (Mahadwar) Of The Ahilya Fort, Maheshwar


One Of The Rare Photograph From- Vintage British Indian Postcard 'H. H. The Holkar's Son on the Elephant. Indore'


H. H. Maharajadhiraj Raj Rajeshwar Sawai Shri Sir Tukoji Rao II Holkar XI Bahadur (Maharaja Of Indore)

 Birth: 03 May 1835, Died: 17 June 1886,
Rule: 27 June 1844 To 17 June 1886 

Actual Reason Behind Maharani Ahilyadevi's Social Work...!!!

ईश्वर ने मुझ पर जो उत्तरदायित्व रखा है,
उसे मुझे निभाना है.
मेरा काम प्रजा को सुखी रखना है.
मैं अपने प्रत्येक काम के लिये जिम्मेदार हूँ.
 सामर्थ्य व सत्ता के बल पर मैं यहाँ - 
जो कुछ भी कर रही हूँ, 
उसका ईश्वर के यहाँ मुझे जवाब देना होगा. 
मेरा यहाँ कुछ भी नहीं है, 
जिसका है उसीके पास भेजती हूँ. 
जो कुछ लेती हूँ, वह मेरे उपर ऋण (कर्जा) है, 
न जाने कैसे चुका पाऊँगी । 

 - देवी अहिल्याबाई


H. H. Maharajadhiraja Raj Rajeshwar Sawai Shri Tukojirao III Holkar XIII Bahadur (Maharaja Of Indore)

Birth - 26 November 1890, Died - May 21 of 1978.
Rule - 31 January 1903 To 26 February 1926

Silver Coin Of The H. H. Maharaja Shivaji Rao Holkar Showing The Sun Radiant.

This Is A Very Rare Specimen Of A Proof Of Milled Coinage For Indore. Year - 1886 

Darbar Hall Of The Lalbagh Palace, Indore (Palace Of The Holkar Maharajas)

 The entrance hall is completely made in marble decorated with beautiful eight large pillars made up of Italian marble. The marble used here are bought specially from mining fields of Italy where these special marbles became extinct these days.

H. H. Maharajadhiraj Raj Rajeshwar Sawai Shri Hari Rao Holkar IX Bahadur (Maharaja Of Indore)

Rule: 17-April-1834 To 24-October-1843

Natural Sight From Ahilya Fort, Maheshwar, Madhya-Pradesh


The Half Statue Of 'Punyashlok Shri Ahilyadevi Holkar' Pune (Maharashtra)

Unveiled By
The Ex.Vice President Of India,
Dr. Gopal Swarup Pathak
On 20 February 1971